Sunday, January 27, 2008

केव्हा तरी पहाटे, उलटून रात गेली

केव्हा तरी पहाटे, उलटून रात गेली
मिटले चुकून डोळे, हरवून रात गेली

सांगू तरी कसे मी, वय कोवळे उन्हाचे
उसवून श्वास माझा, फसवून रात गेली

कळले मला न केव्हा, सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा, निसटून रात गेली

उरले उरात काही, आवाज चांदण्यांचे
आकाश तारकांचे, उचलून रात गेली


स्मरल्या
मला न तेव्हा, माझ्याच गीत पंक्ती
मग ओळ शेवटाची, सुचवून रात गेली


गीतकार :
सुरेश भट
गायक :
आशा भोसले
संगीतकार :
पं. हृदयनाथ मंगेशकर
चित्रपट :
निवडुंग

Vedio:


Audio:
Get this widget Track details eSnips Social DNA

ती गेली तेव्हा


ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता




ती आई होती म्हणूनी, घनव्याकूळ मी ही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता



अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता



Download Audio: From Here

Audio:
Get this widget Track details eSnips Social DNA

Vedio:

ती फुलराणी...




Saturday, January 19, 2008

नाच रे मोरा, आंब्याच्या वनात














नाच रे मोरा, आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच

ढगांशी वारा झुंजला रे
काळा काळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी, वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच, नाच रे मोरा ...

झरझर धार झरली रे
झाडांची भिजली इरली रे
पावसात न्हाऊ, काहीतरी गाऊ
करुन पुकारा नाच, नाच रे मोरा ...

थेंब थेंब तळयात नाचती रे
टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघात, खेळ खेळू दोघांत
निळया सवंगडया नाच, नाच रे मोरा ...

पावसाची रिमझिम थांबली रे
तुझी माझी जोडी जमली रे
आभाळात छान छान सात रंगी कमान
कमानीखाली त्या नाच, नाच रे मोरा ...

गायक :आशा भोसले
संगीतकार :पु. ल.

आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा


















आकाशी
झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा

तुज
भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया
सुखलोलुप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा

घर कसले ही तर कारा, विष समान मोती चारा
मोहाचे बंधन द्वारा, तुज आडवितो हा जैसा उंबरा

तुज पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने
दरी डोंगर हिरवी राने, जा ओलांडून या सरीता सागरा

कष्टाविण फळ ना मिळते, तुज कळते परी ना वळते
हृदयात व्यथा ही जळते, का जीव बिचारा होई बावरा

घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले
घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा


गायक : सुधीर फडके
चित्रपट : आराम हराम है

Tuesday, January 15, 2008

"गोड गोड" बोला..




(सौ. वंदना धर्माधिकारी, कोथरूड)
फ्लॅटसंस्कृती आली आणि माणसांतली प्रेमाची जवळीक कमी झाली. जगात काय चाललंय याची खबर, पण आजारी शेजाऱ्याविषयी कल्पनाही नाही...संक्रांतीच्या "गोड' सणापासून हे चित्र बदलूया आपण?...

Click Here..

Friday, January 11, 2008

सरीवर सर.. (दिवस असे की)

दूरदूर नभपार डोंगराच्या माथ्यावर
निळेनिळे गारगार पावसाचे घरदार
सरीवर सर .... सर .... सरीवर सर ....

तडातडा गार गारा गरागरा फिरे वारा
मेघियाच्या ओंजळीत वीज थिजलेला पारा
दूरवर रानभर नाचणार निळा मोर
मोरपिस मखमल ! उतू गेले मनभर !
सरीवर सर .... सर .... सरीवर सर ....

थेंब थेंब मोती ओला थरारत्या तनावर
शहाऱ्याचे रान आले एका एका पानावर
ओल्या ओल्या मातीतुन वीजवेडी मेघधून
फिटताना ओले उन्ह झाले पुन्हा नवथर
सरीवर सर .... सर .... सरीवर सर ....

उधळत गात गात पाय पुन्हा परसात
माती मऊ काळी साय, हुळहुळ पावलांत
असे नभ झरताना घरदार भरताना
आले जल .... गेले जल .... झाले जल आरपार
सरीवर सर .... सर .... सरीवर सर ....

अशा पावसात सये व्हावे तुझे येणे-जाणे
उमलते ओले रान, रान नव्हे मन तुझे
जशी ओली हुरहुर थरारते रानभर
तसे नाव तरारावे माझे - तुझ्या मनभर !
सरीवर सर .... सर .... सरीवर सर ....


गीत - संदीप खरे
संगीत - संदीप खरे
स्वर - संदीप खरे
अल्बम - दिवस असे की .... (१९९९)

आयुष्यावर बोलू काही.. Ayushyavar Bolu Kahi Poems by Saleel Kulkarni and Sandip Khare

अताशा असे हे मला काय होते...

अताशा असे हे मला काय होते ?
कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते
बरा बोलता बोलता स्तब्ध होतो
कशी शांतता शून्य शब्दात येते

कधी दाटू येता पसारा घनांचा
कसा सावळा रंग होतो मनाचा
असे हालते आत हळुवार काही
जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा

न अंदाज कुठले, न अवधान काही
कुठे जायचे यायचे भान नाही
जसा गंध निघतो हवेच्या प्रवासा
न कुठले नकाशे, न अनुमान काही

असा ऐकू येतो क्षणांचा इशारा
क्षणी दूर होतो दिशांचा पसारा
नभातून ज्या रोज जातो बुडोनी
नभाशीच त्या मागू जातो किनारा

कशी ही अवस्था कुणाला कळावे ?
कुणाला पुसावे ? कुणी उत्तरावे ?
किती खोल जातो तरी तोल जातो
असा तोल जाता कुणी सावरावे ?



गीत - संदीप खरे
संगीत - संदीप खरे
स्वर - सलील कुलकर्णी
अल्बम - आयुष्यावर बोलू काही (२००३)

Saturday, January 5, 2008

भातुकलीच्या खेळामधली... अधुरी एक कहाणी

भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी


राजा वदला, "मला समजली, शब्दावाचुन भाषा
माझ्या नशिबासवे बोलती तुझ्या हातच्या रेषा"
का राणीच्या डोळा तेव्हा दाटुनि आले पाणी ?
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी

राणी वदली बघत एकटक दूरदूरचा तारा"
उद्या पहाटे दुसऱ्या वाटा, दुज्या गावचा वारा"
पण राजाला उशिरा कळली गूढ अटळ ही वाणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी

तिला विचारी राजा, "का हे जीव असे जोडावे ?
का दैवाने फुलण्याआधी, फूल असे तोडावे ?"
या प्रश्नाला उत्तर नव्हते, राणी केविलवाणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी

का राणीने मिटले डोळे दूर दूर जाताना ?
का राजाचा श्वास कोंडला गीत तिचे गाताना ?
वाऱ्यावरती विरून गेली एक उदास विराणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी

भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी

गीत-
मंगेश पाडगावकर
संगीत-
यशवंत देव
स्वर-
अरुण दाते

या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे...अरुण दाते

या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे...

चंचल वारा या जल धारा, भिजली काळी माती
हिरवे हिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती
फुले लाजरी बघून कुणाचे, हळवे ओठ स्मरावे
रंगांचा उघडूनिया पंखा, सांज कुणीही केली
काळोखाच्या दारावरती, नक्षत्रांच्या वेली
सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे
बाळाच्या चिमण्या ओठांतून, हाक बोबडी येते
वेलीवरती प्रेम प्रियेचे, जन्म फुलांनी घेते
नदीच्या काठी सजणा साठी, गाणे गात झुरावे
या ओठांनी चुंबून घेईन, हजारदा ही माती
अनंत मरणे झेलून घ्यावी, इथल्या जगण्या साठी
इथल्या पिंपळ पानावरती, अवघे विश्र्व तरावे...


Lyricist :Mangesh Padgaonkar
Singer :Arun Datye
Music Director :Yeshwant Deo

गीतकार :मंगेश पाडगांवकर
गायक :अरुण दाते
संगीतकार :यशवंत देव

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा...

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा...

रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ...
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा...



Lyricist :Raja Badhe
Singer :Shaheer Sable
Music Director :Shrinivas Khale

गीतकार :राजा बढे
गायक :शाहीर साबळे
संगीतकार :श्रीनिवास खळे

मराठी वीडियो गाणी गर्जा महाराष्ट्र

गर्जा महाराष्ट्र ... अवधूत गुप्ते



Lyrics:
dosto pure Hindustan mein mera Maharashtra ek aisa raajya hai jisake chhote se chhote gaon mein aapako aise log milenge jinaki maatrubhaasha Marathi nahi hai. Lekin maatrubhumi Maharashtra hai.
Wo itane saalon se Maharashtra mein rehate hai ki unake rago mein bhi ab sirf Marathi daudati hai. mera ye geet mere un pyaare bhaaio ke liye hai jo juba se shaayad na ho lekin dil se maratha hai.

maana chalake kabhi tha madraasi maana chalake tha punjabi
maana chalake kabhi tha gujarati maana chalake tha bangali
chaahe koi bhi ho teri bhaasha chaahe koi bhi ho boli
nas nas mein daude hai jo tere
pehachaan hawa hai kaha ki hai paani kaha ka hai mitti kaha ki hai
to khol dil bol dil keh jano se
jai jai jai jai .... Maharashtra majha garaja Maharashtra majha
jai jai Maharashtra majha garaja Maharashtra majha
sing jai jai Maharashtra mera garaja Maharashtra mera - 2
(chot lagi to chillata
hai aai ga
dream girl teri kehati hai bai bai bai bai ga) - 2
panga huva to kehata hai tujhya aaila
khopadi ghuma to kehata hai chya maaila
jor daal bheje pe zara sa
aur soch kaha hai khada tu kaha hai badha tu kis se juda
to khol dil bol dil keh jano se
jai jai jai jai .... Maharashtra majha garaja Maharashtra majha
jai jai Maharashtra majha garaja Maharashtra majha
sing jai jai Maharashtra mera bolo Maharashtra mera - 2
(yaad kar wo tere din bachapan ke
khela kisake aangan mein) - 2
wo nahi thi maa teri par kya kam thi mamta us aanchal mein
jor daal bheje pe zara sa
aur soch kaha hai khada tu kaha hai badha tu kis se juda
to khol dil bol dil keh jano se
jai jai jai jai .... Maharashtra majha garaja Maharashtra majha
jai jai Maharashtra majha garaja Maharashtra majha
Maharashtra majha garaja Maharashtra majha
jai jai Maharashtra majha garaja Maharashtra majha - 2


Dhipadi dhipang... Dr. Salil Kulkarni

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा...

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा...


रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ...
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा...




Lyricist :Raja Badhe
Singer :Shaheer Sable
Music Director :Shrinivas Khale
गीतकार :राजा बढे
गायक :शाहीर साबळे

संगीतकार
:श्रीनिवास खळे


Friday, January 4, 2008

Marathi Poem: ShravanDhara.. Kusumagraj




Wanna meet mAhiwAys OR mahesh ?

Marathi Poem: Shabd.. शब्द..

शब्द

बा॓लताना जरा सांभाळून...
शब्दाला तलवारीप॓क्षा धार असत॓,
फरक फक्त एवढाच की,
तलवारीन॓ मान तर,
शब्दांनी मन कापल॓ जात॓
जरी तलवारीच्या जखम॓तून रक्त
आणि शब्दांच्या जखम॓तून अश्रू...
य॓त असल॓ तरी,
दा॓घांपासून होणारी व॓दना मात्र सारखी असत॓.
म्हणून शब्द जरा सांभाळून...
शब्दाला तलवारीप॓क्षा धार असत॓
शब्दच माणसाला जोङतात आणि
शब्दच माणसाला तोङतात
ह॓ शब्दच आह॓त, त॓ कधी रामायण
तर कधी महाभारत रचतात
॓तुझ्या एका शब्दावर माझ॓ हसण॓
तर, तुझ्या एका शब्दावर
माझ॓ रडण॓ अवलंबून असत॓.
म्हणून शब्द जरा सांभाळून...
शब्दाला तलवारीप॓क्षा धार असत॓

~ mahiways

Marathi Poem

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....
तिला कळतच नाही

तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो...
स्तब्ध होऊन
तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते...
क्षुब्ध होऊन

चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतं
पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत

मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो
बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो

पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही
बोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही

मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं
सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं

काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही
माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही

ती नाही म्हणेल याची भीती वाटते
ती नाही म्हणेल याची भीती वाटते
पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं
तिच्यसाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं

कुणास ठाऊक?
तिच्याही एखाद्या पुस्तकात
माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील

~ mahiways

Marathi Poem

ती सखी लाजली अशी की, शब्द माझे संपले...

त्या तिच्या नयनात गहिर्‍या, भाव माझे गुंतले...
ती सखी लाजली अशी की, शब्द माझे संपले...

मोकळा मग श्वास झाला, धन्य झाल्या भावना;
भास मज झाला असा की, आज जग मी जिंकले...

सावरले मन, बावरले मन, धुंद झाले अन् वेडावले;
पुन्हा त्या क्षितीजास हळव्या, मी नाजुकतेने स्पर्शिले...

तिने माळूनी गजरे कुंतली, मज केले भावगंधीत;
जणू सुगंधाचे पावसाळे, अंगणी माझ्या वर्षिले...

हास्य तिचे निर्मळ, गेले करुनी घाव ह्रदयी;
फिरुनी तिने मागे पुन्हा मग, वेदनेला चुंबीले...

ती सखी लाजली अशी की, शब्द माझे संपले...

~ mahiways

Marathi Poem

By My Friend Gaurav Phaphale:

कळत नाही कधी कधी हे असे का होते....
कळत नाही कधी कधी,
हे असे का होते?
मन कोणासाठी तरी,
एवढे वेडे का होते?

ज्याच्यासाठी हे वेडे होते,
त्याला ते माहितीही नसते,
मग आपल्याच मनाला,
हे असे का होते?

कधी स्वपनांच्या दुनियेत हरवते,
कधी जगाला ही विसरते,
कधी मोहाच्या चार क्षणांसाठी,
हे क्षण क्षण झुरते.

माहिती नाही अजुन हे,
असं किती दिवस चालणार?
स्वपनांच्या दुनियेतून अखेर हे,
माझं मन कधी बाहेर पडणार?


~ mahiways

Marathi Poem

ओळखलत का मुलीँनो मला !!!
ओळखलत का मुलीँनो मला
'गुलाबासह' आला कोणी,
केस होते सलमानसारखे
कानात होती त्याच्यासारखी बाळी

क्षणभर बसला
नंतर हसला
बोलला शर्ट काढुन
’ काल तुझा भाऊ भेटला
गेला बरगड्या तोडुन,

गाढवाला मारल्यासारख
खालुन- वरुन चोपल
रिकाम्या हाती जाईल कसा
अँतर्वस्त्र तेवढे वाचल!!

चपले कडे हात जाताच
तावा - तावात बोललो,
चप्पल,बुट नको मुळी
फ़क्त ड्रेस तेवढा पाढवा!!

मोडुन पडली प्रेम स्टोरी
तरी मोडला नाही चाळा
एखादी ’ बीन भावाची ’ पोरगी असेल तर...
तेवढ नक्की कळवा....


~ mahiways

Prerana...प्रेरणा...

प्रेरणा...Prerana..
एकदा लग्न झालं की, आपलं आयुष्य सुखात जाईल असं आपल्याला वाटत असतं...
असा वाटण्याची जागा मग,
मूल झालं की...
मोठं घर झालं की...
अशा अनेक इच्छांच्या अंगाने वाढतच जाते.
दरम्यानच्या काळात, आपली मुलं अद्याप मोठी झालेली नाहीत. ती जरा मोठी झाली की सारं ठीक होईल, अशी आपण मनाची समजूत घालू लागतो.
मुलांच्या वाढत्या वयात, त्यांच्या भवितव्याच्या सुंदर स्वप्नांनी आपण आपले दिवस सजवत असतो. मुलं जरा करती सवरती झाली की सारं कसं आनंदानं भरून जाईल, असं आपल्याला वाटत असतं.
आपला नवरा / बायको जरा नीट वागायला लागला लागली की...
आपल्या दाराशी एक गाडी आली की...
आपल्याला मनाजोगी सुटी मिळाली की...
निवृत्त झालो की...
आपलं आयुष्य कसं सुखानं भरून जाईल, असं आपण सतत स्वतःशीच घोकत असतो.
खरं असंय, की आनंदात असण्यासाठी, सुखात असण्यासाठी आत्ताच्या वेळेपेक्षा दुसरी योग्य वेळ कोणतीही नाही.
आयुष्यात आव्हानं तर असणार आहेतच. ती स्विकारायची आणि ती झेलता झेलताच आनंदी राहायचा निश्‍चय करायचा हेच बरं नाही का?
जगायला - खरोखरीच्या जगण्याला - अद्याप सुरुवात व्हायचीये, असंच बराच काळ वाटत राहतं.
पण, मध्ये बरेच अडथळे असतात. काही आश्‍वासनं पाळायची असतात, कोणाला वेळ द्यायचा असतो, काही ऋण फेडायचं असतं....
आणि अगदी शेवटी कळतं, की ते अडथळे म्हणजेच जीवन होतं.
या दृष्टिकोनातून पाहिलं की कळतं,
आनंदाकडे जाणारा कोणताही मार्ग नाही.
आनंद हाच एक महामार्ग आहे.
म्हणून प्रत्येक क्षण साजरा करा.
शाळा सुटण्यासाठी... शाळेत पुन्हा जाण्यासाठी... वजन चार किलोने कमी होण्यासाठी... वजन थोडं वाढण्यासाठी... कामाला सुरुवात होण्यासाठी... एकदाचं लग्न होऊन जाऊदे म्हणून... शुक्रवार संध्याकाळसाठी... रविवार सकाळसाठी... नव्याकोऱ्या गाडीची वाट बघण्यासाठी... पावसासाठी... थंडीसाठी... सुखद उन्हासाठी... महिन्याच्या पहिल्या तारखेसाठी... आपण थांबून राहिलेले असतो. एकदाचा तो टप्पा पार पडला की, सारं काही मनासारखं होईल, अशी आपणच आपली समजूत घातलेली असते. पण, असं काही ठरवण्यापूर्वी आनंदी होण्याचं ठरवा.
आता जरा या पुढे दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या पाहू -
१ - जगातल्या पहिल्या दहा सर्वांत श्रीमंत माणसांची नावं सांगा पाहू.
२ - गेल्या पाच वर्षांत विश्‍वसुंदरी किताब मिळवणऱ्यांची नावं आठवतायत?
३ - या वर्षीच्या पाच नोबेल विजेत्यांची नावं सांगता येतील?
४ - गेल्या दोन वर्षांतल्या ऑस्कर विजेत्यांची नावं लक्षात आहेत का?
हं! काहितरीच काय विचारताय? असं तर वाटलं नाही ना तुम्हाला? पण, असं वाटलं नसलं तरी, या प्रश्‍नांची उत्तरं देमं तसं सोपं नाहीच, नाही का?
टाळ्यांचा कडकडाट हवेत विरून जातो.
पदकं आणि चषक धूळ खात पडतात.
जेत्यांचाही लवकरच विसर पडतो.
आता या चार प्रश्‍नांची उत्तरं द्या पाहू -
१ - तुमच्यावर ज्यांचा प्रभाव आहे अशा तीन शिक्षकांची नावं सांगा बरं.
२ - तुम्हाला अगदी तातडीची गरज असताना मदत करणाऱ्या तीन मित्रांची नावं सांगता येतील?
३ - आपण म्हणजे अगदी महत्त्वाची व्यक्ती आहोत, असं तुम्हाला वाटायला लावणाऱ्या एखाद-दोघांची नावं सांगता येतील तुम्हाला?
४ - तुम्हाला ज्यांच्याबरोबर वेळ घालवायला आवडतो अशा पाच जणांची नावं सांगा बरं.
क्षणभर विचार करा.
आयुष्य अगदी छोटं आहे.
तुम्ही कोणत्या यादीत असाल? काही अंदाज लागतोय?
मी सांगतो.
जगप्रसिद्ध व्यक्तींच्या यादीत तुमचं नाव नक्कीच नाहिये. पण, हा मेल ज्यांना आवर्जून पाठवावा असं मला वाटलं, त्यांच्या यादीत तुमचं नाव नक्कीच आहे....
आता एक गोष्ट.
काही वर्षांपूर्वीची. सिएटलच्या ऑलिम्पिकमध्ये शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेले नऊ स्पर्धक स्पर्धा सुरू होण्याच्या संकेताची वाट पाहात जय्यत तयार उभे होते. ही सारी मुलं शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या अपंग होती.
पिस्तुलाचा आवाज झाला आणि शर्यत सुरू झाली. साऱ्यांनाच पळता येत होतं असं नाही. पण, प्रत्येकाला स्पर्धेत भाग घ्यायचा होता आणि महत्त्वाचं म्हणजे जिंकायचं होतं.
धावता धावता एकाचा तोल गेला. काही गोलांट्याखाऊन तो पडला आणि रडू लागला.
त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून अन्य आठही जण पळायचे थांबले.
सारे मागे फिरले... सारे जण...
"डाउन्स सिन्ड्रोम'ची व्याधी असलेली एक मुलगी त्याच्या जवळ बसली. तिने त्याला मिठी मारली आणि मग विचारलं, ""आता बरं वाटतंय?''
मग साऱ्यांनी त्याला उभं केलं आणि अंतिम रेषेपर्यंत सारे खांद्याला खांदा लावून चालत गेले.
ते दृष्य पाहून मैदानावर उपस्थित असलेले सारेजण हेलावून गेले. उभे राहून मानवंदना देत साऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. बराच काळ त्या टाळ्यांचा आवाज आसमंतात गुंजत होता...
त्यावेळी तिथे उपस्थित असलेली मंडळी अजूनही त्या घटनेची आठवण काढतात.
का?
कुठेतरी आत खोलवर आपल्याला प्रत्येकाला ठाऊक असतं की आयुष्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती स्वतःसाठी जिंकण्यापेक्षा कितीतरी मोठी असते.
आयुष्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे इतरांना जिंकायला मदत करणं. त्यासाठी वेळप्रसंगी आपला वेग कमी करावा लागतो किंवा अगदी शर्यतच बदलावी लागते.
शक्‍य तितक्‍या लोकांना हे सांगा. त्यानं आपलं हृदयपरिवर्तन घडून येईल. कदाचित इतरांचंही...
दुसरी मेणबत्ती लावण्यासाठी वापरल्याने पहिल्या मेणबत्तीचं काहीच कमी होत नाही. नाही का?

~ Mahiways

Marathi Poem: Swapna स्वप्न

By My Friend Gaurav..

स्वप्न
स्वप्नात एकदा मी देवाला विचारलं,
नशीबाच पुस्तक तुच कारं लिहायच ?
मी पान उलगडायचं,अन जगानं ते वाचायचं,
पानंच संपत आल्यावर .. पुस्तक तुच बंद करायचं,
जगाच्या मोठया पसाय्रातुन एकटं नेऊन जाळायचं !!
देवाचं उत्तरं
तुला कुणी सांगीतलयं, फ़क्त पानं उलगडायला,
मी कधी नाही म्हट्लयं ,
माझ पान फ़ाडायला, अन तुझ पान जोडायला?
तुझं नशीब तुझ तुच लिहयचं
आता तुच ठरवं,नावासहित मरायचं की
नावं माग ठेऊन जगायचं.............

Marathi Poem: नशीबवान तर सगळेच असतात..

नशीबवान तर सगळेच असतात By my Friend Gaurav

नशीबवान तर सगळेच असतात
नशीबाला बदलणारा एखादाच असतो...

हसतमुख तर सगळेच असतात
दुसर्याला हसवणारा एखादाच असतो...

मर्त्य तर सगळेच असतात
कर्तुत्ववान अमर एखादाच असतो...

चमकणारे कजवे बरेच असतात
प्रखरतेने उजळणारा एखादाच असतो...

सुखचे सोबती सर्वच असतात
दुःखचा साथीदार एखादाच असतो.....

अनुभवाने शहाणे बरेच असतात
अनुभवालाही शहाणा करणारा एखादाच असतो...

जाळणारे बरेच असतात
मेणबत्तीप्रमाणे जळणारा एखादाच असतो...

Thursday, January 3, 2008

Marathi Video Songs.. More...

Durge Durgat Bhari- Aga Bai Arechya :Video




Man Udhaan Vaaryache - Aga Bai Arechya :Video




Cham Cham - Aga Bai Arechya :Video




Kombadi Palali :Video




Ye go ye Maina :Video



~mAhiwAys